
आज सकाळी पत्रकारांशी बोलतांना जरांगे म्हणाले, सरकारने मराठा अरक्षणासंदर्भात आदेश काढले असले तरी ते आमच्यापर्यंत अद्याप पोहचलेले नाहीत. प्रसार मध्यमांकडून आम्हाला काही माहिती मिळाली आहे. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची आमची मागणी आहे. मात्र, आमच्या कुणाकडेच कुणबी असल्याची नोंद नाही. त्यामुळे यात सरकारने सुधारणा करावी. तो पर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले.





