
अनिश रियाज करताना त्रास होत असल्यामुळे तिच्यावर चिडतो. तिच्या वागण्याचा त्रास सर्वांना होतो. त्यावर चिडून ईशा म्हणते “तुमच्या संगीताचा पण आवाज येतोय तो चालतो का?” त्यावर अरुंधती ईशाला समजावण्याचा प्रयत्न करते की, ‘संगीताची पूजा करणारे हे घर आहे. त्यामुळे तुझं संगीत माझं संगीत असे काही नाही. अनिश फक्त एवढच सांगतोय की तू हळू आवाजात गाणी ऐक.’ त्यावर ईशा चिडून बोलते की हे अनिश नाही तू त्याच्या तोंडून बोलून घेत आहे. ईशाचे हे वागणे पाहून सर्वांनाच धक्का बसतो.







