
मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. खुनी नदीला आलेल्या पुरामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच पुरामध्ये अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात आल्याने लोकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.





