
मराठी चित्रपटसृष्टीमधील कलाकार हे सतत मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असतात. दरम्यान त्यांना येणार अनुभव हे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऋजुता देशमुखने लोणावळ्यात जाण्यासाठी तळेगावला ८० ऐवजी २४० रुपये टोल भरावा लागल्याचे सांगत संताप व्यक्त केला होता. त्यापाठोपाठ आता अभिनेते, कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी देखील डबल टोल भरावा लागल्यामुळे संताप व्यक्त केला आहे.








