
रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट करत बॉलिवूडमधील गडबाजी आणि त्यांच्या वागणूकीमुळे होणाऱ्या त्रासाविषयी माहिती दिली होती. तो म्हणला होती की, “मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही. कारण माझ्याकडे कोणता पुरावा नाही. परंतु, मी या विषयावर बोलतो कारण या सगळ्याचा (गडबाजीचा) अनुभव मी सुद्धा घेतला आहे. एकटं पाडणं, दुषणं लावणं, प्रसारमाध्यमांमध्ये अफवा पसरवणं, याचा अनुभव मी घेतला आहे. २००३-०५ पर्यंत या दोन वर्षात मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. आज ज्यांची नाव समोर येत आहेत, त्याच लोकांनी माझ्यासोबत हे सगळं केलं. परंतु, माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्यासोबत होते म्हणूनच मी या सगळ्यातून बाहेर पडू शकलो. एक काळ असा होता की माझ्याविषयी फार नकारात्मकता पसरवली गेली होती, त्यामुळे माझ्यावर देश सोडण्याचीही वेळ आली होती. तर हा योगायोग होता?- नाही. हे जाणूनबुजून करण्यात आलं होतं”







