
पुढे ती म्हणाली, “यानंतर मग मी शांतपणे ठरवले की जर मी त्यासाठी वेळच देत नाही. तर मी संचालिकापद मिरवण्यात काहीच अर्थ नाही. यानंतर मग मी प्रमोदला तू ही अकॅडमी पूर्णपणे सांभाळ, असे सांगितले. तसेही ती अकॅडमी तोच सांभाळत होता. त्यामुळे मग माझे नाव आणि पदाचे मी काय करु, असा प्रश्न मला पडला होता. खूप चांगले कलाकार या अॅकेडमीने घडवलेत. प्रमोदने खूप चांगले काम केले. त्याने या माध्यमातून सिनेसृष्टीला चांगले कलाकार दिले. मी जोपर्यंत त्या अॅकेडमीमध्ये सक्रीय होते, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सक्रीय होते. पण आता मला वेळच देता येत नाही तर मग वेगळे झालेले बरे.”






