
या चित्रपटाविषयी बोलताना एकाने लिहिले की, ‘वरूण धवन नेहमीच आपल्या अभिनयाने आमची मनं जिंकतो.’ तर, दुसर्या एकाने चित्रपटाचे कौतुक करताना लिहिले की, ‘मी नुकताच बवाल पाहिला. त्यानंतर मी वरुण आणि जान्हवीच्या अभिनयाचा फॅन झालो आहे. चित्रपटाची कथा खूप चांगली आहे.’ काही लोकांना वरुण आणि जान्हवीच्या ‘बवाल’मधील गोंधळ चांगलाच आवडला आहे. तर, काहींनी चित्रपटाविषयी कुरबुरी देखील केल्या आहेत. या सर्व बाबी पाहता या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.







