
मात्र, आता तिने पुन्हा एकदा प्रतीकवर दबाव टाकून त्याला अश्विनीला खोटं पडायला लावलं आहे. मयुरी आणि प्रतीकला वेगळं करण्यासाठी अश्विनी हे खोटं बोलत आहे, हे मयुरीला जाऊन सांगायचं असा दबाव तिने प्रतीकवर टाकला. तर, मयुरीच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये म्हणून प्रतीकने देखील शिल्पीच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी केल्या आहे. यामुळे आता मयुरी आपल्या आईवर आरोप करत प्रतीकची बाजू घेत आहे. याच गोष्टीचा आता अश्विनीला खूप त्रास होणार आहे. तर, शिल्पीचा हाच डाव आता साध्या होणार आहे.







