
मनातील हीच खदखद सांगताना श्रेयस पुढे म्हणाला की, ‘काय बोलणार…होतोच मी पनवती कदाचित.. कारण तेव्हा हाताला काहीच काम नव्हतं.’ ही आठवण सांगताना श्रेयस तळपदे भावूक झाला होता. श्रेयस तळपदेने मराठी मालिका, चित्रपट यासोबतच बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्याने ‘इक्बाल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने ‘ओम शांती ओम’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘गोलमाल ३’, ‘हाऊसफुल २’, ‘गोलमाल अगेन’ यासारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे.







