
प्रत्येक वडीलांचे हे त्यांच्या मुलावर प्रेम असते. विशेष करुन वडील आणि मुलीचे नाते हे खास असते. अनिरुद्ध आणि ईशाचे देखील असेच काहीसे आहे. मात्र आपल्या नकाराने मुलीला त्रास होत आहे हे अनिरुद्धला कळताच तो सगळं बाजूला ठेवून ईशाच्या साखरपुड्यासाठी तयार होतो. तसेच अनिशकडून ‘ईशाला कधीच कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही’ असे वचन घेतो.






