Monday, August 17, 2026
Homeसातारातंत्र-मंत्राने नाही तर विकासकामांनीच निवडणुका जिंकता येतात – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

तंत्र-मंत्राने नाही तर विकासकामांनीच निवडणुका जिंकता येतात – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

फलटण :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या घराबाहेर अघोरी तांत्रिकाचा जादूटोण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “लोकशाहीत निवडणुका या जनतेच्या मतांवर जिंकल्या जातात, तांत्रिक-मांत्रिक किंवा जादूटोण्याच्या माध्यमातून नाही. अशा अघोरी प्रकारांमुळे समाजात अंधश्रद्धा पसरते आणि त्याला माझा तीव्र विरोध आहे.”
पुढे बोलताना त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीकास्त्र सोडत म्हटले की, “राजकारणात विकास, कामगिरी आणि जनतेचा विश्वास महत्त्वाचा असतो. निवडणुका जिंकण्यासाठी तांत्रिकांचा आधार घेणे म्हणजे स्वतःच्या कामावरचा विश्वास उडाल्याचे द्योतक आहे.”
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वातावरण तापले असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments