
सक्तवसुली संचलनालयाने (ED) तामिळनाडूतील दोन दलित शेतकऱ्यांना बजावलेल्या समन्सनंतर वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर शेतकऱ्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरण बंद करावे लागले. ५ जुलै २०२३ रोजी ७२ वर्षीय शेतकरी कन्नैयन आणि त्यांचा ६६ वर्षीय भाऊ कृष्णन यांना ईडीने समन्स बजावले होते. मात्र आता वाद वाढल्यानंतर प्रकरण बंद करण्यात आले आहे. ईडीच्या या निर्णयाला राजकीय पक्षांबरोबरच जनतेमधूनही खूप विरोध झाला.








