
Jayant Patil on Devendra Fadnavis : बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज पुण्यात पोलिसांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वेगळं मत मांडलं आहे.