
सायलीच्या प्रश्नांना उत्तर देताना अर्जुन तिला सांगणार आहे की, ‘मला माहीत होतं तुम्हाला गायब करण्यामागे महिपतचाच हात असणार. पण, आता जर मी महिपतच्या विरोधात काहीही बोललो, तर पूर्णा आजी आणि बाबा यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि पुन्हा एकदा तुम्हाला काहीतरी गोष्टी सुनावल्या जातील. याशिवाय आपल्या घरातील अशा काही व्यक्ती आहेत, ज्या महिपतला या सगळ्यात मदत करत आहेत. जर मी आता काही बोललो असतो, तर त्या सगळ्या गोष्टी लगेच महिपतपर्यंत पोहोचल्या असत्या. त्यामुळे इथून पुढे आपल्याला फार विचार करून पुढची चाल आखावी लागणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांना असंच दाखवत राहायचं की, तुम्ही मंदिराच्या मागे बेशुद्ध पडला होतात.’







