सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यास कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू

0
1


सातारा: जिल्ह्यातील सुळवस्ती येथे अत्यंत ह्रदयद्रावक घटना घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती (Satara) येथे आज दुपारी ह्रदयद्रावक घटनेत तिघांना दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये पोहण्यासाठी (Sunk) उतरलेले तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 ते 35 वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे. 

कालव्यात पोहण्यासाठी उतरल्यानंतर झालेल्या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक, श्रीराम जगाई हेबरम आणि सतीन बीवजी नाईक या तिघांचा पाण्यात बुडून, गुदमरुन मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेतील मृत तिघेही मूळचे ओडीसा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईपमधून बाहेर काढण्यात आले आहे. तसेच, या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

रॅश ड्रायव्हिंगने घेतली बळी

भंडाऱ्यात रॅश ड्रायव्हिंगने स्टील उत्पादक सनफ्लॅग कंपनीत प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक असलेल्या तरुणाचा बळी घेतला. ही घटना भंडाऱ्याच्या वरठी येथील सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर दोन दिवसांपूर्वी घडली होती. कर्तव्यावर असलेला हा सुरक्षारक्षक प्रवेशद्वार बंद करीत असताना त्याचवेळी भरधाव आणि रॅश ड्रायव्हिंग करून कंपनीत प्रवेश करणाऱ्या एका कार चालकानं त्याला जबर धडक दिली, यात तो गंभीर जखमी झाला. प्रथम भंडाऱ्यात आणि नंतर त्याच्यावर नागपूर इथं उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. सितीन रहांगडाले (25) असं मृतकाचं नावं असून तो मुळचा गोंदिया जिल्ह्याच्या तिरोड्यातील डव्वेटोला येथील रहिवासी आहे. कुटुंबीयांनी आज त्याचा मृतदेह थेट सनफ्लॅग कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवला. सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक मोबदला आणि मृत्युनंतरचे सर्व आर्थिक लाभ द्यावे, अशी मागणी करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत हा मृतदेह कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर सनफ्लॅग कंपनी प्रशासनं आणि सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या एजन्सीनं मृतकाच्या कुटुंबीयाला आर्थिक मोबदला आणि लेखी आश्वासन दिल्यानंतर प्रकरण निवळलं. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता वरठी आणि भंडारा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा

जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार

आणखी वाचा



Source link