
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन ही जोडी चाहत्यांची अतिशय लाडकी जोडी आहे. दोघांची जोडी नेहमीच चाहत्यांच्या पसंतीस उतरते. या दोघांना एकत्र पाहून चाहते देखील नेहमीच खूप खूश होतात. मात्र, अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात काही महिन्यांपासून दुरावा येत असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. या बातम्यांमुळे चाहत्यांची खूप निराशा झाली होती. दरम्यान, अभिषेकचे वडील, बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी केलेली एक पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आयुष्यात सर्व गोष्टी किती क्षणिक आहेत हे सांगितले आहे.