शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा

0
15
शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण! शंभू सीमेवर पुन्हा तणाव, पोलिसांचा शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा


Farmer Protest near Shambhu border : हरयाणा पोलिसांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम असलेल्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शंभू सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आहे. दिल्लीकडे निघालेल्या १०१ शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवून त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. यामुळे या आंदोलनाला हिंसक वळण लागले.  याशिवाय पोलिसांनी शेतकऱ्यांवर वॉटर कॅननचा मारा देखील  केला. यापूर्वी ६ आणि ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र,  हरियाणा पोलिसांनी त्यांना सीमेवरच रोखले. पोलिसांनी त्यांच्यावर अश्रुधुराचा वापर केला. या झटापटीत अनेक शेतकरी जखमी झाले होते.



Source link