शाश्वत जीवनशैली शिकवणारे ‘शाश्वत भारत सेतू’ आता नागपुरात दाखल

0
1
शाश्वत जीवनशैली शिकवणारे ‘शाश्वत भारत सेतू’ आता नागपुरात दाखल


पुणेस्थित ‘द इको फॅक्टरी फाउंडेशन’चे संस्थापक आनंद चोरडिया यांनी ‘वेस्ट टू वेल्थ’, जल व्यवस्थापन, ऊर्जा बचत यांसारख्या अनेक संकल्पना यावेळी तपशीला स्पष्ट करून सांगितल्या. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जन कसे कमी करावे, चक्राकार अर्थव्यवस्थेचे महत्त्व तसेच ग्रामीण, शहरी, औद्योगिक व व्यक्तिगत विभागांत शाश्वतता (Sustainability) कशी साध्य करावी हेही स्पष्ट केले आहे. शाश्वत भारत सेतू हा खऱ्या अर्थाने भारताला शून्य कार्बन उत्सर्जनाकडे घेऊन जाणारा पूल असल्याचे चोरडिया म्हणाले. हे केंद्र अनेकांना प्रेरित करेल आणि सर्वसामान्य नागरिक शाश्वत भविष्यकाळाकडे जाणाऱ्या प्रवासात सहभागी होऊ शकतील, अशी आशा चोरडिया यांनी व्यक्त केली.



Source link