वाई; धनंजय घोडके : दक्षिण काशी समजल्या जाणार्या वाईला कृष्णाकाठाची सोबत व निसर्गसौंदर्याचा भरभरून खजिना लाभला असून पश्चिम भागातील डोंगरदर्या तर पर्यटकांसह चित्रपटसृष्टीलाही भुरळ घालत आहे. त्यामुळे हिंदी, मराठी, तेलगु, गुजराती, भोजपुरी चित्रपट सृष्टी या परिसराच्या प्रेमात पडली. त्यातून मोठ्या बॅनरचे चित्रपट याच मातीतून साकारले. सरगम, गंगाजल, चेन्नई एक्स्प्रेस, मृत्यूदंड, स्वदेश, हम तुम्हारे है सनम अशा कितीतरी चित्रपटांचे शुटींग झालेल्या या परिसराकडे आता मात्र चित्रपट निर्मात्यांनी पाठ फिरवली असून सिनेमांच्या चित्रीकरणाचे पॅकअप झाले. काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे काही चित्रपटांचे अर्धवट शुटींग दुसरीकडे न्यावे लागले. गुंडगिरीमुळे तालुक्याच्या समृद्ध वारशाला गालबोट लागले आहे.
एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपट बनवणे निर्मात्यांना परवडेना
वाई व परिसरातील निसर्गसौंदर्य व पूरक वातावरणामुळे हिंदीतील मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची या भागाला प्रथम पसंती मिळायची. परंतु वाईच्या पश्चिम भागातील एजंटांचा झालेला सुळसुळाट हा शुटींगच्या कामात मोठा अडसर ठरत आहे. एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपटाचे बजेट कोलमडत असून चित्रपट बनवणे निर्मात्यास परवडत नाही. त्यातच गावगुंडांचा त्रास हा या व्यवसायाच्या मुळावर येवून बसला आहे.
महागणपती घाट, मेणवलीचा वाडा, धोम धरण परिसराची शुटींगला भुरळ
पाचगणी, महाबळेश्वरकडे फिरायला येणार्या पर्यटकांची संख्या दरवर्षी लाखोंच्या घरात आहे, पर्यटकांच्या व्यवसायावर या भागातील लोक अवलंबून आहेत. वाईचा महागणपती घाट, मेणवलीचा नाना फडणवीसांचा वाडा, मांढरदेव, पसरणी घाट, पश्चिम भागात असणारे धोम- बलकवडी धरण, धबधबे, हिरवेगार डोंगर ही ठिकाणी चित्रपटांच्या शुटींग साठी योग्य आहेत. त्यामुळेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शुटींग होत होते.
एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपट बनवणे निर्मात्यांना परवडेना
वाई व परिसरातील निसर्गसौंदर्य व पूरक वातावरणामुळे हिंदीतील मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची या भागाला प्रथम पसंती मिळायची. परंतु वाईच्या पश्चिम भागातील एजंटांचा झालेला सुळसुळाट हा शुटींगच्या कामात मोठा अडसर ठरत आहे. एजंटांच्या अपेक्षा वाढल्याने चित्रपटाचे बजेट कोलमडत असून चित्रपट बनवणे निर्मात्यास परवडत नाही. त्यातच गावगुंडांचा त्रास हा या व्यवसायाच्या मुळावर येवून बसला आहे.
स्थानिकांच्या व्यवसायाला खीळ
या भागातील तरुणांच्या हाताला काम नसल्याने मुंबई – पुणे सारख्या शहराकडे ते धाव घेत आहेत. तसेच या भागात मोठ्या प्रमाणात शुटींगचा व्यवसाय नजरेसमोर ठेवून दुप्पट रक्कम देवून जमिनी खरेदी केल्या जात आहेत. मोठी हॉटेल्स व फार्महाऊस उभारले जात आहेत. भाड्याने देण्यासाठी चार चाकी गाड्या खरेदी केल्या आहेत त्याही जमिनी विकून. परंतु चित्रपट निर्मार्त्यांनी पाठ फिरवल्यानंतर शुटींग बंद झाले व स्थानिकांच्या व्यवसायाला खीळ बसली आहे.
या सुविधा दिल्यास शुटींगसाठी लागेल लाईन
या भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची अद्ययावत सेवा, राहण्यासाठी लागणारे हॉटेल्स, शेतावरील निसर्ग सानिध्यातील भोजनाची सुविधा, टेंट टाकून देण्याची व्यवस्था, धोम धरणाच्या धर्तीवर बलकवडी धरणात सुध्दा बोटिंग व्यवस्था, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून बलकवडी धरणावर उतरण्यासाठी रोप वे, धोम धरणातून चक्कर मारण्यासाठी विमानासारखी सेवा, धोम धरणाजवळ सर्व सोयीनींयुक्त असे हिंगिंग गार्डन, धोम नरसिंह मंदिराची डागडुजी, संपूर्ण रींगरोड, पांडवगड, रोहिडेश्वर मंदिर, नवरा-नवरीचा डोंगर, केंजळगडाचा विकास अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागात चित्रपट निर्माते शुटींगसाठी लाईन लावून उभे राहतील अशी परिस्थिती आहे.
चित्रपट निर्मात्यांना हवे संरक्षण
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या भागाचे भूमिपुत्र आहेत. त्यांनीच वाई परिसरातील चित्रपट सृष्टीचा वारसा जतन करण्यासाठी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याद़ृष्टीने गावगुंडांचा बंदोबस्त करून चित्रपट निर्मात्यांना संरक्षण देणे गरजेचे आहे.
सेटवर जावून पैशासाठी दंगा
काही वर्षांपूर्वी या भागात हिंदी, मराठी, तेलगु, भोजपुरी चित्रपट निर्माते शुटींग करण्यासाठी येत असायचे. अनेक मोठ्या बॅनरच्या चित्रपटांचे शुटींग या ठिकाणी होत होते. यामध्ये सरगम, गंगाजल, चेन्नई एक्स्प्रेस, मृत्युदंड, स्वदेश, हम तुम्हारे है सनम, या बरोबरच लागीर झालं जी, मुलगी झाली हो अशा अनेक टीव्ही मालिकांचे शुटींग या भागात झाले आहे. परंतु काही स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांमुळे काही चित्रपट अर्धवट शुटींग ठेवून दुसरीकडे हलवावे लागले. सेटवर जावून पैशासाठी दंगा करून शुटींग बंद पाडण्याचे प्रकार घडले आहेत.
या सुविधा दिल्यास शुटींगसाठी लागेल लाईन
या भागातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची अद्ययावत सेवा, राहण्यासाठी लागणारे हॉटेल्स, शेतावरील निसर्ग सानिध्यातील भोजनाची सुविधा, टेंट टाकून देण्याची व्यवस्था, धोम धरणाच्या धर्तीवर बलकवडी धरणात सुध्दा बोटिंग व्यवस्था, महाबळेश्वरच्या केट्स पॉईंटवरून बलकवडी धरणावर उतरण्यासाठी रोप वे, धोम धरणातून चक्कर मारण्यासाठी विमानासारखी सेवा, धोम धरणाजवळ सर्व सोयीनींयुक्त असे हिंगिंग गार्डन, धोम नरसिंह मंदिराची डागडुजी, संपूर्ण रींगरोड, पांडवगड, रोहिडेश्वर मंदिर, नवरा-नवरीचा डोंगर, केंजळगडाचा विकास अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यास या भागात चित्रपट निर्माते शुटींगसाठी लाईन लावून उभे राहतील अशी परिस्थिती आहे.
एजंटगिरी मोडून काढावी लागेल
या व्यवसायावर अवलंबून असलेल्या वाई तालुक्यातील आर्थिक घडी पूर्णपणे ढासळली आहे. तालुक्यातील हॉटेल्स, लॉजवाले, चारचाकी गाड्या, भाजी-पाला विक्रेते, खानावळ व्यवसायिक, स्थानिक कलाकार, शेतकरी, ग्रामपंचायत, घोडागाडीवाले, या सर्वच व्यवसायिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात पुन्हा चित्रपट शुटींगसाठी सुगीचे दिवस आणावयाचे झाल्यास या भागातील गुंड प्रवृत्तीची एजंटगिरी मोडून काढावी लागणार आहे.