
घोष यांनीम्हटले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बंगालमधून भाजपचे १२ खासदार निवडून आलेआहेत. त्यापैकी २ खासदार आमच्या संपर्कात आहेत. दोन्ही खासदारांनी आमच्याशी संपर्क साधून तृणमूल काँग्रेसमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, त्यांना ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली काम करायचे आहे. २१ जुलै रोजी होणाऱ्या शहीद दिवस कार्यक्रमात ते तृणमूलमध्ये प्रवेश करू शकतात. या खासदारांची ओळख सध्या उघड करता येणार नाही. एवढेच नाही तर, हे खासदार नुकतेच निवडून आले आहेत. यामुळे पक्षांतरविरोधी कायद्याच्या कक्षेत येऊ नये, म्हणून तृणमूल नेतृत्वाने त्यांना काही काळ थांबण्याचा सल्ला दिला असल्याचेही घोष यांनीम्हटले.