
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी एका पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनीराहुल गांधी यांच्या’भारत जोडो न्याय यात्रे ‘ची माहितीही दिली. त्यांनी सांगितले की, न्याय यात्रा ६७०० किमी अंतर कापणार आहे. मणिपूरचा मुद्दा उपस्थित करताना खर्गे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, पंतप्रधान प्रत्येक ठिकाणी जातात मात्र ते मणिपूरला का जात नाहीत?







