
या तीन चिमुकल्यांना सोडून आई प्रियकरासह, तर वडील त्याच्या प्रेयसीला घेऊन घरातून पसार झाले आहेत. ही संताप आणणारी घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील सातारा परिसरात घडली आहे. दोघेही घरातून पळून जाऊन तीन महिन्यांचा काळ लोटला आहे. आई-वडील मुलांना वाऱ्यावर सोडून गेल्याने आपल्या माता-पित्याची चातकाप्रमाणे वाट पहात आहेत.