
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळला आहे. यावरून शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर आता मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. यांना दैवत कळत नाही. यांना कशात खावं कळत नाही. कुणालाही सोडू नका, सर्वांना जेलमध्ये टाका अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली आहे.