
महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतरदेखील गेले १० दिवस राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला नाही. त्यात राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सरकार स्थापनेसाठी संथगतीने सुरू असलेल्या या प्रक्रियेवर विरोधकांनी फिरकी घेत टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना गृहमंत्रीपद का हवं आहे, या मागचे कारण शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितलं.