
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत वृद्धांना मोठी भेट देण्यात आली आहे. आता ७० वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या सर्व वृद्धांना आयुष्मान आरोग्य योजनेंतर्गत आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांच्यावर ५ लाखांपर्यंत मोफत उपचार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.