
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी मुसळधार पावसानंतर शाहपूर शहरातील एका मंदिराची भिंत कोसळली. या अपघातानंतर अनेक मुले ढिगाऱ्याखाली गाडली गेली. यामध्ये ९ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. सागरचे जिल्हाधिकारी दीपक आर्य यांनी दिलेल्या माहितीनुसार काही मुले जखमी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, तर घटनास्थळावरून सर्व माती आणि ढीगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. काल रात्रीपासून येथे मुसळधार पाऊस पडत होता. त्यामुळे ही भिंत पडल्याचे समजते. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ९ मुलांचे वय १० ते १५ वर्षे आहे.