
मलिकयांनी म्हटले की, मला वाटते की, जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा त्यांना परत करायला पाहिजे. केंद्र सरकारने आर्टिकल ३७० कलम रद्द करून जम्मू काश्मीरला केंद्र शासित राज्य बनवले. त्यांना भीती वाटत होती की, राज्यातील पोलीस विद्रोह करतील. मात्र जम्मू काश्मीर पोलिसांनी नेहमी केंद्र सरकारला साथ दिली आहे.अमित शाह यांनी आश्वसन दिले हे की, ते राज्याचा दर्जा परत करतील. त्यामुळेत्यांनी लवकरात लवकर राज्याचा दर्जा परत करून निवडणूक लावावी. सत्यपाल मलिक म्हणाले की, हे लोक राज्याचा दर्जा परत का करत नाहीत, समजण्यापलिकडे आहे. याबाबत माझी त्यांच्याशी चर्चा झाली होती. त्यावर ते म्हणाले की, म्हटलं तर आहे करायची काय गरज आहे. सर्वकाही ठीक तर चाललं आहे. मात्र येथे काहीच ठीक चाललं नाही. दहशतवादी घटना वाढल्या आहेत. राजौरीमध्ये दररोज काही ना काही होत असते.








