
राज्यात देशी गायींच्या संख्येत घसरण झाल्याने त्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारने आज काही उपाययोजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्यात देशी गायींना राज्यमाता गोमातेचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. शिवाय गोशाळांमध्ये दाखल केलेल्या गायींना प्रती गाय ५० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. देशी गायीच्या दुधात ए २ प्रोटिन असल्याने शहरी भागात त्याची मागणी वाढत आहे. परंतु देशी गायी फार कमी दूध देत असल्याने त्याच्या पालनपोषणावर भरपूर खर्च येतो. शिवाय देशी गायीच्या दुधाला भाव मिळत नसल्याने देशी गायींच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.