
why is guardian minister post so important : नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनतेने भरघोस मतांचे दान टाकत तब्बल २३५ जागांवर विजय मिळवून दिला. त्यानंतर ५ डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी झाला व नंतर हिवाळी अधिवेशनात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. मात्र त्यानंतर जवळपास तीन आठवड्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा करण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्री पदाचं वाटप कसं करायचं, ह पेच महायुतीच्या नेत्यांसमोर होता. अखेर १८ जानेवारी रोजी पालकमंत्री पदाचं वाटप जाहीर झालं. त्यानंतर दोनच दिवसात दोन जिल्ह्यातील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्याची वेळ सरकारवर आली आहे. मंत्रिमंडळ विस्तारापासून अनेक नेत्यांनी पालकमंत्रीपदासाठी ल़ॉबिंग केले होते. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात केवळ इतकं चर्चेत नसलेलं पद आता इतकं महत्वाचं का वाटू लागलं आहे?