महाआघाडीतील जागावाटपावरून राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; नाना पटोलेंनी सांगितले CEC बैठकीत काय घडलं?

0
1
महाआघाडीतील जागावाटपावरून राहुल गांधी राज्यातील नेत्यांवर नाराज; नाना पटोलेंनी सांगितले  CEC बैठकीत काय घडलं?


जागावाटपात योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नसल्याने राहुल गांधी नाराज आहेत, अशी चर्चा आहे. यावर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला माध्यमांतून टार्गेट केले जात आहे. आमचे नेते राहुल गांधींचे बरोबर आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. मेरिटच्या आधारावर विशेषकरून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्यात. पण, आघाडी धर्मामुळे जागावाटपाचा घोळ झाला आहे. देशातील तसेच राज्यातील सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, ही राहुल गांधींची अपेक्षा आहे. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींची आहे. त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त ओबीसी लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.



Source link