
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल बऱ्याच जणांना अनपेक्षित होता. अनेक एक्झिट पोल्स व राजकीय तज्ज्ञांचा अंदाज फोल ठरवत महायुतीची जोरदार लाट पाहायला मिळाली.महायुतीने महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत करतपुन्हा सत्ता काबीज केली आहे. लाडकी बहीण योजनेसह ओबीसी समाजाचा मिळालेला भरघोस पाठिंबा,यामुळे महायुतीचा हा ऐतिहासिक विजय साकारला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर आताओबीसी आरक्षण आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी महायुतीकडे मोठी मागणी केली आहे.