
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध करत याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज एकत्रित सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.





