
खेडमधून कांदिवलीतल्या उमेदवाराला कसं पाडेन!
रामदास कदम यांचा गद्दारीचा इतिहास मोठा आहे. १९९० मधील निवडणुकीत त्यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप कीर्तिकर यांनी केला होता. त्यालाही कदम यांनी उत्तर दिलं. १९९० च्या निवडणुकीला आता ३३ वर्षे झाली. त्यावेळी मी खेडमधून आमदारकीची निवडणूक लढवत होतो. तिथं उमेदवार असताना कांदिवलीत त्यांना पाडायला कधी आलो. उलट शाखाप्रमुख म्हणून मी केलेल्या कामामुळं ते निवडून आले होते. त्यामुळं बेईमान कोण आहे, हे जगाला माहीत आहे, असं कदम म्हणाले.






