
Rahul Gandhi on Kolhapur : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडल्याच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. ‘शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामागे संदेश होता. तो संदेश असा होता की भाजपची विचारधारा चुकीची आहे. त्यांची नियत चांगली नसल्यामुळंच हा पुतळा पडला, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला.