
BJP Rebel Candidates : राज्यात निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे. अर्ज माघारीनंतर लढतीचे चित्र स्पष्ट झालं आहे. बंडखोरांनी दोन्ही आघाड्यांची डोकेदुखी वाढवली आहे. अनेक जण निवडणूक रिंगणात असून त्यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतला नाही. दरम्यान, भाजपने पक्षातील बंडखोरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. तब्बल ४० बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. या ४० जणांमध्ये अनेक बड्या नेत्यांचा देखील समावेश आहे.