
मलिहाबादचे सहाय्यक पोलीस आयुक्त धर्मेंद्र सिंह यांनी सांगितले की, नवरदेवाने रहिमाबाद पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. रहिमाबाद स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) अनुभव सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये काम करणारा पण मूळचा उन्नावच्या ओरियास देवपूरचा रहिवासी असलेला नवरदेव सोनू गुरुवारी रात्री वरात घेऊन निघाला आणि त्याच रात्री रहिमाबादच्या हासिमपूरला पोहोचला. गावात पोहोचताच त्यांनी त्यांना मिळालेल्या लग्नाच्या ठिकाणाचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी वधूच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला, मात्र कोणाशीही संपर्क होऊ शकला नाही. परिणामी, नवरदेव आणि संपूर्ण वऱ्हाड तक्रार दाखल करून परतले,’ अशी माहिती एसएचओने दिली.