
फेंगल चक्रीवादळाने तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये हाहाकार माजवला आहे. तामिळनाडूतील धर्मापुरी आणि कृष्णागिरी जिल्ह्यांतील पश्चिमेकडील जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. कृष्णागिरीला गेल्या दोन ते तीन दशकांत अभूतपूर्व पूर आला असून पुराच्या पाण्यात कार आणि इतर वाहने वाहून गेली आहेत. सखल भागात पाणी साचले आहे.