
देवेंद्र फडणवीसांचं ज्ञान एवढं तोकडं असेल असा मला वाटलं नाही. कारण, वटहुकूम काढण्याचा अधिकार संसदेला आहे. दिल्लीतील वटहुकून हा दिल्ली सरकारने फिरवला का नाही, तो केंद्राने फिरवला. हा अधिकार केंद्राला आहे. देवेंद्र यांना मी थोडंतरी समजत होतो, पण आता असं वाटतंय की, ते मंत्रालयाच्या आजुबाजूला फिरकण्याच्याही कुवतीचे नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.







