
‘प्रेमाची गोष्ट’ ही झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये स्थान पटकावले आहे. आता या मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. सावनीने सागरला तुरुंगात टाकले आहे. या सगळ्याचा आनंद साजरा करत असतानाच मिहिरने सगळे आरोप स्वत:वर घेत तुरुंगात जाण्याचे ठरवले. आता सावनी पुढे काय करणार हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.








