प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात

0
2
प्रवाशांसाठी खुशखबर! मुंबई-नागपूर आता फक्त ८ तासांत, समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात


Samruddhi Expressway : राज्यातील प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  मुंबई ते नागपूर या ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी एक्सप्रेसवेचे  काम पूर्ण झाले आहे. पुढील महिन्यात या महामार्गाचे लोकार्पण होणार आहे.  या द्रुतगती महामार्गाला ‘हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ असे नाव देण्यात आले आहे. नागपूर ते नाशिकमधील इगतपुरी हे अंतर ६२५ किलोमीटर असून येथील काम शेवटच्या टप्प्यात आले आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यावर  मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या काही तासांवर येणार आहे. पूर्वी नागपूर ते मुंबईला जाण्यासाठी  १६ तास लागत होते. हा प्रवास आता  ८ तासांवर येणार आहे.



Source link