
Pune Water Issue : पुणेकरांची पाण्याची गरज भागवण्यासाठी अतिरिक्त पाण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र, यावर आता जलसंपदा विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. शहराच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी महापालिकेने पाण्याच्या पुनर्वापर, सांडपाण्यावर प्रक्रिया व धरणांमधील पाण्याचे आरक्षण बिगर सिंचनासाठी वाढविण्यास लागणारा भुर्दंड सोसावा तसेच अर्टीची पूर्तता केल्याशिवाय पुण्याला अतिरिक्त पाणी वाढून देणार नक्षी अशी भूमिका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे पुणेकरांना वाढीव पाणी मिळणार की नाही हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.