पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम: अंतर्मनात खाेल रुजावी‎ अशी आपली भाषा असावी

0
19
पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:  अंतर्मनात खाेल रुजावी‎ अशी आपली भाषा असावी


  • Marathi News
  • Opinion
  • Our Language Should Be Such That It Can Be Absorbed Into The Heart By Pt. Vijayshankar Mehta’s Column.

16 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भाषा शब्दांशी जोडली गेली असली तरी, आजकाल ती आवाजाशी‎जोडली गेली आहे. आवाज मोठा आणि कर्कश असलेल्यांची भाषा‎लोक ऐकतात आणि समजून घेतात. मोबाईल फोनच्या युगात भाषेने‎वेगळे रूप धारण केले आहे. नवीन पिढी मोबाईल फोनची भाषा बोलते‎आणि समजते. म्हणून सुज्ञ लोक त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलू‎लागले आहेत.

भगवान शिव यांनी गरुडाला काकभूशुंडीकडे पाठवले‎तेव्हा पार्वती विचार करत होती, तुम्ही स्वतः रामकथा सांगू शकला‎असता. मग तुम्ही पक्ष्यांच्या राजाला काकभूशुंडीकडे का पाठवले?‎भगवान शिव यांनी उत्तर दिले, //”कछु तेहि ते पुनि मैं नहिं राखा,‎समुझइ खग खगही कै भाषा।.’ भगवान शिवाचा हा विचार आज‎आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. आपली भाषा आवाजाशी‎जोडलेली नसली तरी किमान आपण बोलत असलेल्या लाेकांना‎त्याचा अर्थ समजायला हवा आणि अपेक्षित गाेष्ट साध्य व्हायला‎पाहिजे. भाषा अशी खोलवर पोहोचणारी असावी.‎ ‎



Source link