
मुंबई महापालिका काय म्हणते?
बेकायदा विक्रेते आणि फेरीवाल्यांवर वेळोवेळी कारवाई केली जाते, परंतु ते परत येत राहतात, मुंबई महानगरपालिकेचे वकील एस. यू. कामदार यांनी सांगितलं. भूमिगत बाजारपेठेच्या पर्यायावरही महापालिका विचार करीत असल्याचं ते म्हणाले. त्यावर, ही समस्या जमिनीत गाडण्याचा महापालिकेचा प्रयत्न दिसतोय, अशी मिश्किल टिप्पणी न्यायालयानं केली.







