
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील ईडी, सीबीआयच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता. त्यात पहिली अटक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाली होती. त्यानंतर नवाब मलिक, संजय राऊत यांच्यावरही अटकेची कारवाई झाली. कालांतरानं अनिल देशमुख, संजय राऊत यांना न्यायालयानं क्लीन चिट दिली. तर, नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला.