
‘तुमच्या घरी दसरा चांगला झाला असेल दिवाळीही चांगली जाईल,पण आमच्या घरात दसरा नाही व दिवाळीही नाही..’, असे काळीज पिळवटून टाकणारं पत्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या लेकीनं थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. या मुलीच्या वडिलांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. ही मुलगी हिंगाली जिल्ह्यातील रहिवाशी असून तिने लिहिलेले पत्र वाचून कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. कर्जबाजारीपणामुळे बळीराजा टोकाचं पाऊल उचलतो. मात्र त्याच्यामागे कुटूंबाची कशी फरफट होते, याचे विदारक दृश्य या चिमुकलीच्या पत्रातून समोर येते.






