
जया बच्चन या नेहमीच फोटोग्राफर्सशी काही तरी विचित्र वागताना दिसतात. त्या सतत फोटोग्राफर्सवर चिडताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याला संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी हजेरी लावली. पण यावेळी ऐश्वर्या राय मिसिंग नव्हती. अमिताभ बच्चन, श्वेता नंदा, निखिल नंदा, नव्या नवेली, अभिषेक बच्चन हे सर्वजण एकत्र या लग्नाला पोहोचले होते. ऐश्वर्या आणि आराध्या या वेगळ्या लग्नाला आल्या होत्या. त्यामुळे बच्चन कुटुंबात काही तरी खटके उडत असल्याचे दिसत आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसेच अभिषेकने घस्फोटाशी संबंधीत पोस्ट लाइक केल्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले. आता येत्या काळात अभिषेक किंवा ऐश्वर्या यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहण्यासारखे आहे.