
हिंदूंच्या घरांवर व मंदिरांवर हल्ले –
मठ, मंदिरांवरील हल्ले, देवी-देवतांची विटंबना, मालमत्तेची लूट आणि बळजबरीने धर्मांतर करणे निंदनीय आहे, परंतु संस्थात्मक उदासीनता आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना बळ मिळाले आहे, असे कुमार म्हणाले. बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येत सातत्याने होत असलेल्या घसरणीबाबत अरुण जी म्हणाले की, १९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या २२ टक्क्यांवरून आज केवळ ७.९५ टक्क्यांपर्यंत घसरणे हे संकटाचे गांभीर्य दर्शवते. हिंदूंचा, विशेषत: अनुसूचित जाती-जमातींचा ऐतिहासिक छळ हा एक सततचा मुद्दा आहे. मात्र, गेल्या वर्षी संघटित हिंसाचार आणि सरकारी निष्क्रियतेचे प्रमाण चिंताजनक आहे.








