पं. विजयशंकर मेहता8 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
बीएसएफचे घोषवाक्य //”फर्स्ट लाइन ऑफ डिफेन्स’ आहे. मुलांसाठीहेच संस्काराचे तत्वज्ञान बनते. आता मुलांसाठी संस्कार हीच फर्स्टलाइन ऑफ डिफेन्स असावी. जगात यशस्वी दिसणाऱ्यांनी ते जादूनेसाध्य केलेले नाही. त्यांनी वारंवार प्रयत्न केले आहेत. त्यांच्यानिर्णयांत दृढता राखली आहे. पूर्ण समर्पण, कठोर परिश्रमाने काम केलेआहे. सध्या हे संस्कार आहेत. आपली मुले यशस्वी होतील तेव्हा जगत्यांचे यश पाहील. परंतु त्यांना त्यामागील मूल्ये दिसणार नाहीत.आपणही घरी फक्त बोलून आणि समजावून सांगून आपल्या मुलांनामूल्ये शिकवू नयेत. संस्कार शिकवण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजेआचरण. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन असे असले पाहिजे की तेमुलांसाठी संस्कृती बनतील. आपण त्यांना विनासंस्कार यशाचे रहस्यशिकवले तर आपली आणि आपल्या मुलांची इच्छाशक्ती थकूनजाईल. संपूर्ण कुटुंब थकून जाईल. आज लोक मुलांचे संगोपनकरण्यात अधिकाधिक निराश होतात. याला एक आव्हान समजा,समस्या नाही. त्यावर उपाय म्हणजे योग्य वेळी योग्य संस्कार रुजवणे होय


