
Jalgaon News : जळगाव जिल्ह्याच्या पाळधी गावात ३१ डिसेंबरच्या रात्री मोठा राडा झाला. दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक करत काही दुकाने जाळली. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या परिवारास घेऊन जात असलेल्या वाहन चालकाने हॉर्न वाजवल्याच्या कारणातून हा राडा झाला आहे. पाळधी गावचे काही तरुण व शिवसेनेचे काही कार्यकर्ते भिडले असून संतप्त जमावाने पाळधी गावात दगडफेक करत तब्बल १२ ते १५ दुकाने पेटवून दिली.