
रशीद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, नव्या विधानसभेत निवडून आलेल्या सरकारला मर्यादित अधिकार असतील. पाच वर्षे गुपकार आघाडीला काहीच करता आले नाही. आता इंडिया ब्लॉक, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, पीपल्स कॉन्फरन्स आणि माझ्या पक्षाला माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी एका गोष्टीवर एकत्र यावे. आम्हाला माहित आहे की इंडिया अलायन्सची सक्ती आहे, त्यांनी काश्मीरच्या लोकांकडून मते घेतली परंतु कलम ३७० च्या मुद्द्यावर कॉंग्रेस गप्प राहिली. माझी त्यांना सूचना आहे की, राज्याचा दर्जा बहाल होईपर्यंत नवे सरकार स्थापन न करण्याचा प्रयत्न करावा.